सोशल मीडिया
सोशल मीडीया आज सकाळी सहज वॉट्सअप उघडले अन पाहतो तर काय? अगदी मोबाईल हँग व्हावा एवढे मॅसेज एकानंतर एक येऊन धडकायला सुरूवात झाली.थोडावेळ नुसते बघतच रहावे लागले आणि मग कुठे संदेश ऊघडायला सुरूवात झाली.मी एक-एक संदेश पाहत होतो त्यात शुभ सकाळ,शुभ,दुपार,शुभ रात्री,हा संदेश अकरा जणांना पाठवा........सह अनेक संदेश होते.एका मित्राने पाठवलेला छानसा संदेश वाचला व त्याचे अभिनंदन केले.एवढे चांगले संदेश सुचतात कसे असा प्रश्न मी त्याला करताच त्याचा रिप्लाय आला ‘गुगल प्ले स्टोर’ वर सर्व ॲप्स मिळतात.त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश असतात.तोपर्यंत काही मित्रांनी त्या संदेशाला दाद द्यायला सुरूवात केली होती. त्याने मला एका ॲप्लीकेशनची लींक पाठवली मी सहज उघडुन पाहीतली पाहतो तर काय त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश अगदी यादी करून तयार होते.केवळ कॉपी करा आणि हवे तेथे पोस्ट करा.सुविचार,वैचारीक,गुड मॉर्निंग,गुड नाईट,हॅपी बर्थ डे,शुभेच्छा संदेश,दुख संदेश इ.अनेक प्रकारचे संदेश त्यात अगदी तयार होते.मग मला प्रश्न पडला या रेडीमेड संदेशाने मानसाच्या भावना माणसापर्यंत पोहोचत असतील का? यामध्ये आजची तरूण पीढी गुरफटत तर चालली न