परवाच दहावीचा निकाल जाहीर झाला.अनेकजण भरघोस टक्के मार्क घेऊन पास झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे कौतुक व्हायलाच हवे ! यात दुमत नाही मात्र याचवेळी कमी मार्क घेणारांना घरच्यांसह शेजाऱ्यांचे व पाहुण्यांचे टोमणे सहन करावे लागत आहेत. या टोमण्यांमुळे मात्र या विद्यार्थ्यांची पुरती पंचायत होत आहे.टक्केवारी चांगली आहे पण त्याच्या किंवा तिच्या एवढी का नाही म्हणुन पालक मुला-मुलींना दुखावत असल्याने कित्येक विद्यार्थी स्वत : ला कोसताना पहावयास मिळत आहेत.मला या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे.ती गोष्ट आहे एका कुरूप बदकाच्या पिलाची. एका बदकाला चार पिल्लं होतात त्यातील तीन पिलं अगदी छान दिसत असतात, मात्र चौथे पिल्लु जरा कुरूप दिसत असते.ते कुरूप दिसत असल्यामुळे त्याची तीन्ही भावंड त्याला कुरूप म्हणुन चिडवत असतात. खेळायला जायचे असल्यास ते भावंड त्याला सोबत घेत नसत व त्याला दिसण्यावरून त्याला सतत चिडवत असत. त्यांचे पाहुन इतर प्राणी देखील त्या पिलाला चिडवायला लागतात. त्...
पिंपळनेर तालुकानिर्मीतीबद्दल माझे मत... गणेश इंगोले पिंपळनेर मो. ९५६१४३०६७१ पिंपळनेर सर्कल म्हटल की मला आठवतं ते इथल्या जेष्ठ नागरीकांनी सांगीतलेल व वर्तमान पत्रातुन वाचलेल कधी काळी गल्ली ते दिल्ली सत्तेची फळे चाखणार पिंपळनेर,पण आज जर या गावाकडे पाहीतल तर गावाचा जो विकास व्हायला पाहीजे होता तेवढ्या प्रमाणात झाला नाही.आज या गावाची अवस्था त्या बैलासारखी झाली आहे जो आयुष्यभर मालकाच्या शेतात राब-राब राबतो अन मालक त्याला त्याच्या म्हातारपणी खाटकाला विकतो.कारण जर निरीक्षण केल तर अस लक्षात येईल की या गावातील बहुतांश लोक हे बाहेरून आलेले आहेत.बाहेरून येऊन इथे व्यवसाय,शेती करणारे या लोकांना देखील या गावाने भरभरून दिले आहे.मात्र आता वेळ आली आहे आपण या गावाला काही देण्याची या गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची विकासाचा अनुशेष जर कशाने भरुन निघणार असेल तर याच उत्तर कदाचीत तालुका निर्मीतीच्या प्रश्नात दडलेल असाव.म्हणुन या गावातुन व सर्कल मधुन मोठ्या प्रमाणत या प्रश्नावर सक्रीय होण्यची आणि लोकअंदोलन उभारण्याची गरज आज भासताना दिसुन येत आहे. काल परवा वर्तमान पत्रात वाचल अंबेजोगाई ...
मला आवडलेले काही विचार मी आज माझी पहीली पोस्ट म्हणुन या ठिकाणी लीहीत आहे हे विचार माझे नाहीत परंतु ते मल मनापासुन आवडतात म्हणुन मी या ठीकाणी ते लीहीत आहे व पुढेही लीहीत राहील...... मंजील मिले ना मीले ये तो मुक्कदर की बात है हम कोशीश भी ना करे ये तो गलत बात है जिंदगी जख्मो से भरी है वक्त को मलहम बनाना सिख लो हारणा तो है एक दिन मैत से फिलहाल दोस्तो के साथ जीना सिख लो हे असे असले तरी हे असे असणार नाही येणार आहे दिवस त्याचा तो घरी बसणार नाही निसर्गाच्या नियमांना जे लाथाडतात त्यांच्यावर नियतीच्या दु:खाच्या लाथा खाण्याचे प्रसंग येतात.परंतु जे निसर्गाचे नियम लक्षात घेउन आपल्या जिवनाला योग्य ते वळण लावतात त्यांच्यावर नियतीकडुन सुख शांतीच्या फुलांचा वर्षाव होतो. तुम्हाला वाटत असेल ना तुमचा उद्याचा दिवसा चांगला यावा तर आजच कामाला लागा काबाड कष्ट करा,कारण तुमचे आजचे दिवस हे तुमच्या पुर्वजांची देण आहेत.तेव्हा तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करा.कारण एक मुल आपला आदर्श आपल्या वडीलांतच पाहत असत म्हणुनच मनापासु...
Comments
Post a Comment