Posts

माणसं असे का वागत असतील?

या पृथ्वीवर अनेक जीव आहेत त्यापैकी मानव हा सर्वात प्रगत आणि हुशार असा जीव आहे. माणुस हा खुप विचीत्र प्राणी आहे. माणसांचे त्यांच्या वागण्यावरून अनेक प्रकार पडतात काही माणसे खुप कडक शिस्तीचे असतात, काही बिन्‍दास असतात तर काही खुप खडुस असतात, काही अगदी मायाळु स्वभावाची तर काही कपटी आणि कारस्थानी स्वभावाचे असतात. मला यातील जवळपास सर्व प्रकारची मानसे भेटली.खुप वेळा माझे त्यांच्याशी जमले नाही,कधी त्यांचे वागणे मला तर कधी माझे वागणे त्यांना खटकत असे परंतु जेव्हा-जेव्हा समोरा समोर येऊन बोलत असु तेव्हा मात्र मणात कसलाही मळ न राखता अगदी झाल गेलं विसरून कुठलाही आकस न ठेवता आम्ही पुन्हा कामाला लागलो.   मात्र वरील प्रकारातील कपटी आणि कारस्थानी लोक हे कायम असमाधानीच राहीलेली मी पाहीतले आहेत. खर तर या लोकांना इतरांचे चांगले झालेले खपत नाही. यांना इतरांची प्रगती देखवत नाही यांच्या कायम पोटात दुखत असते. यांच्या इच्छा कधीही पुर्ण होत नाहीत. या प्रकारातील माणसे सतत इतरांना त्रास देण्याच्या नव-नवीन युक्त्या शोधत असतात. या प्राकारातील माणसं म्हणजे निचपणाचा कळस असतात. हे कधी कुठल्या थराला जातील याच...

“पाणी आलं रे गणु”

आज पुन्हा एकदा एक निरीक्षण घेऊन आलो आहे, प्रसंग तसा नवीन किंवा अनोळखी नाही. साधारण सायंकाळचे पाच वाजले असतील माझा फोन खणाणला पलीकडुन आवाज आला, “ पाणी येणार आहे लवकर घरी ये .” फोनवर माझे वडील होते.गेली पंधरा ते विस दिवस झालं डोळयात पाणी आणुन आम्ही पाण्याची वाट पाहत होतो.आज पाणी येणार म्हणुन मी ऑफीसातली सर्व कामे टाकुण पटकन धावत घराच्या दिशेने निघालो.घाई गडबडीत घराकडे निघालो असल्याने रस्त्याने होत असलेल्या गोंगाट आणि गोंधळाकडे माझं फारसं लक्ष नव्हत घरापर्यंत पोहोचलोच होतो तेवढ्यात आमच्या शेजारी राहणाऱ्या राधा मावशीच्या घरासमोर थोडीशी गर्दी दिसली तसे पाणी आल्यानंतर घरासमोर गर्दी म्हणजे पाणी पाहीजे असेल म्हणुन आले असतील असं मला वाटलं, पण जवळ जाताच गर्दीतुन आवाज आला “ मोटर बंद करा आगोदर ” हो सद्या आमच्या गावात पाण्याचा प्रश्न अगदीच गंभीर झाला आहे.काल पाणी आले पिण्याचा माठ भरतो न भरतो तोच नळाने नटखटपणे गुळण्या मारायला सुरू केले, ते पाहुण रांजणी तर लगेचच रूसुबाइर रूसु म्हणत कोपऱ्यात जाऊन बसली ते थेट आजच तीचा रूसवा काढण्याचा योग आला होता.त्यात राधा मावशीच्या घरी उद्या कार्यक्रम म्हणुन जास्त...

गणु, तुझा सरकारवर भरोसा न्हाय काय?

‍विशेष सुचना : ज्यांना विनोदी भाषा कळत नाही त्यांनी लेख नाही वाचला तरी चालेल.विशेष करून भक्तांनी. साधारण सायंकाळच्या पाच वाजेची वेळ असेल, मी ऑफीसातलं काम संपवुन घराच्या दिशेने चाललो होतो तेव्हा बाजुच्या दुकानातुन अचानक माझ्या नावाने आरोळी आली.अचानक आलेली आरोळी ऐकुन मी मागे पाहीले तर ती आरोळी माझ्याच एका नातेवाइकाने दिली होती.कधी जास्त न बोलणारे म्हणुन मी त्यांच्या हाकेला ओ देत रस्त्याच्या बाजुलाच असणाऱ्या एका दुकानात जेथे ते बसले होते तीथे गेलो. मी काही बोलण्याच्या आत त्यांनी “ सरकारवर भरोसा नाही का ?” असा प्रश्न मला विचारला.हा प्रश्न त्यांनी मलाच का विचारला या गोष्टीचा अंदाज मला लगेचच लागला ( कारण थोडयाच वेळार्वी राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक कसलाही आक्षेप न घेता एकमताने संमत केले होते. त्याचाच सोहळा ते त्या दुकानातील दुरचित्रवाणीवर बघत बसले होते आणि शेवटी याच सरकारने मराठा आरक्षण दिले की नाही म्हणत टिऱ्या बडवीत वाहवा लुटत होते.त्यावर मी मागील सरकारने गंडवले हे देखील गंडवणार अश्या आषयाची एक पोस्ट थोबाडपुस्तकावर ( फेसबुक ) लीहीली होती. ) ती त्यांनी पाहीली असावी त्या...

व्हाट इज लव?

Image
प्रेम म्हणजे काय ? खर तर आजच्या या बॉलीवुडच्या जमान्यात हा प्रश्न विचारणे   म्हणजे अज्ञानाचे लक्षण ठरेल पण खरे प्रेम म्हणजे काय असं विचारल तर.... तर मात्र बरेच जण गोंधळात पडतील कारण प्रत्येकाची आपआपली वेगवेगळी प्रेमाची व्याख्या आहे.कुणी काळजी घेण्याला प्रेम समजत तर कुणी काळजी करण्याला प्रेम समजतं.कोणी आकर्षणाला प्रेम समजतं तर कोणी आवडण्याला प्रेम समजुन बसतात तर काहीजण भलत्याच प्रकाराला प्रेम म्हणतात. आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.एखादी व्यक्ती आवडल्यानंतरच प्रेम होत हे जरी खर असलं तरी आवड आणि प्रेम वेगवेगळेच कारण चित्रपटातल्या नट-नटया आपल्याला आवडत असले तरी ते एक आकर्षण असतं जे प्रत्येकाला आहे.हल्लीच्या जमान्यात प्रेम सुध्दा मॅगी सारख झालं आहे.पाच मिनीटांत प्रेम होतं आणि आठवडयात संपत देखील मग हे खरं प्रेम झालं का.खरं प्रेम कुठुन येत त्यात काय म्हत्वाच असतं . बाह्य सौंदर्य ? आईच प्रेम बघा कस असतं एखाद्या आईचं बाळ कुरूप जरी असलं तरी त्या आईला ते प्रिय असतं ती आई त्या बाळाला टाकुण देत नाही उलट ती त्याची जास्त काळजी घेते.त्याला प्रत्येक गोष्टीत विश्वास देते.त्या...

"ये सूरत बदलनी चाहिए"

आपण भारतीय म्हणजे शांत,संयमी आणि मायाळु लोकं.आपला भावनांक नेहमी बुध्यांकावर मात करत असल्यामुळे अपण बऱ्याचवेळा लोकांच्या खोट्या बोलण्याला देखील बळी पडतो.म्हणुनच आपण नेहमी आपल्या देशातील नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन प्रत्येक वेळा त्यांना निवडुन देत असतो आणि नेहमी फसत असतो पण पुन्हा आपल्याला कोणीतरी भावनीक साथ घालत येत आपल्याला पुन्हा फसवत. आपण समजतो आज नाहीतर उद्या तरी हा आपले काम करेल या वेड्या आशेपोटी आपण या भामट्या मंडळींच्या आहारी जाऊन नकळत त्यांच्या सारखे निर्दयी होऊन जातो हे आपले आपल्याला कळत नाही.त्यातली त्यात आज तर निर्दयीपणाची स्पर्धाच लागली की काय असे वाटायला लागले आहे ; कारण आपल्या देशात आणि शहरात अशा काही घटना घडत आहेत ज्यांच्यामुळे आपल्यात माणुसकी आणि प्रेम नावाचे काही गुण शिल्ल्क आहेत की नाही यावर प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.           खुप दिवसांपुर्वीच्या नाही अगदी या आठवडयातील काही घटना पाहल्या तर आपणास देखील या गोष्टीचा प्रत्यय येईल.काल परवा सोशल मिडीयावर एक पोस्ट फिरत होती,युपी मधल्या एका अल्पवयीन मुलीस जिवंत ज...

"सोशल मिडीयाचा असाही वापर "

Image
फेसबुक 2004 साली उदयास आलेल एक सोशल मीडीया ( समाज माध्यम ) हे माध्यम “ फ्रेंड ऑफ फ्रेंड ” या प्रकारातील असल्यामुळे यावर तुम्ही काही   लीहील अथवा अपलोड केल की ते तुमच्या मित्रांना तर दिसतच त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या मित्रांना देखील दिसत ज्यांना तुम्ही ओळखत देखील नसता मग ते देखील त्यावर त्यांची आवड अथवा प्रतीक्रीया देऊ शकतात आणि तुम्ही नविन मित्र जोडु शकता याच वैशिष्ट्यामुळे हे माध्यम इतक्या कमी कालावधीत एवढ प्रचंड लोकप्रिय झाले की असे अनेक समाज माध्यम उदयास आली ती देखील लोकप्रिय झाली परंतु फेसबुकच्या लोकप्रीयतेत तसुभरही कमतरता आली नाही.सद्य स्थितीत फेसबुकची कार्यरत वापरकर्ता संख्या 2 अब्जाहुनही अधिक आहे तर जगाची एकुण लोकसंख्या 7.3 अब्ज असल्याची समजते यावरून या समाज माध्यमाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येवु शकेल.           फेसबुकच्या सुरूवातीचा काळातील वापर म्हणजे जुने मित्र / मैत्रीण शोधणे व त्यांच्याशी गप्पा मारणे हा होता परंतु जसजशी इंटरनेट क्रांती होत गेली शहरातील इंटरनेट खेडोपाडी आणि गल्लोगल्ली चालायला लागल तसतशी सामान्...

अपयश नव्हे ते यशच

Image
परवा दिवशी वर्तमान पत्र उघडल पाहतो तर काय? अगदी पहील्याच पानावर परिक्षेत मार्क कमी मिळाले म्हणुन विद्यार्थ्याची आत्महत्या अशी ठळक अक्षरातील बातमी दिसली.केवळ परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणुन निराश होऊन जिवन संपवले वाचुन खुप वाईट वाटले.आणि मनात विचार आला की,आजच्या ह्या एकविसाव्या शतकातील हे मुलं एवढया कमकुवत मानसिकतेचे कसे असतील आणि यांचे 10 वी 12 वी मार्क यांचे आयुष्य ठरवणार आहेत का? या मुलांवर विनाकारण दबाव आणनारे कोण तर त्यांचेच पालक आणि नातेवाईक कारण तेच फोन करून सांगतात ना आमच्या भैय्याला 98 टक्के पडले तुमच्या भैय्याला किती पडले? आपण देखील आपल्या मुलाला टोमने मारायला सुरू करतो त्याला 98 पडले तुच कसा असा मुर्ख निघाला.बर मला हे सांगा तो 98 वाला जिवनाच्या परिक्षेत पास होईल का? मी कित्येक मुलांना पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल पाहील आहे.अशी मुल जगण विसरत चालली आहेत.ती एकलकोंडी होत आहेत.जगण्यातला निखळ आनंद त्यांच्या वाट्याला येत नाहीये.अगोदर त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.त्यांना भरपुर जगु द्या, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना काय आवडत काय नाही ते बघा.अन्यथा अशी मुल केवळ पालकांच...